कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाला नागरिकांनी योग्य ती दक्षता घेऊन सहकार्य करावे -संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर, दि.15:- जगात अनेक देशात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. महाराष्ट्रात सुध्दा मागील काही दिवसांत रुग्ण आढळले आहे. या संसर्गला नागरिकांनी न घाबरता योग्य ती दक्षता घ्यावी व या विषाणू च्या प्रतिबंधासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून नागरिकांनीही त्याला सहकार्य करावे व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.
या आजाराची लक्षणे - ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत.
हा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येते की,
चेहऱ्याला/ नाकाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.
सॅनीटायझर किंवा साबणाने हात वारंवार धुवावेत.
खोकला किंवा शिंक आल्यास तोंडाला रुमाल किंवा टिशू पेपर धरावा.
पुर्ण शिजलेले अन्न शाकाहारी/ मांसाहारी अन्न खावेत.
मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्यावेत.
चिकन, मटन प्रमाणित दुकानातुन घ्यावेत.
भरपूर पाणी प्यावे.
अशी काळजी नागरिकांनी घ्यावीत. यासोबतच
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकू नये
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
चेहऱ्याला / नाकाला वारंवार स्पर्श करु नये.
ताप आणि खोकला असलेल्या रुग्णांचा सहवास टाळावा.
प्राण्यांचा निकट संपर्क टाळावा.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा संसर्ग पसरु नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबत नागरिकांनी आपली जबाबदारी समजुन शासनास सहकार्य करावे व खालील महत्त्वाच्या सुचनांचे पालन करावे.
कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरु नये.
त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अफवा किंवा चुकींच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.
तुम्ही या विषाणुग्रस्त भागात प्रवास केला असेल आणि जर ताप, खोकला आणि श्वास घ्यावयास त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. व त्यांच्या सल्ल्यांने भरती व्हावे.
लक्षण आढळून आल्यास काळजी घ्या व शासकीय रुग्णालयांशी संपर्क करावा.
राष्ट्रीय कॉल सेंटर क्र. 91-11-23978046
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र. 020-26127394
टोल फ्रि हेल्पलाईन क्र. - 104
लातूर जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. - 02382 246803
या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.